जेव्हापासून छत्रपतींच्या इतिहासाचा ध्यास लागला तेंव्हापासून ह्या जिवाचं
सोनं झालं.
शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत माझा जन्म झाला हे मी भाग्य समजतो. ज्याप्रमाणे बाकीच्या राज्यांना भूगोल आहे पण महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की ज्याला भूगोलाच्या बरोबरच देदीप्यमान असा इतिहासही आहे. या भूमीला इतिहास आहे वारकरी संप्रदायाच्या आणि धारकर्यांच्या हातातील भगव्या ध्वजाचा, या भूमीला इतिहास आहे विविध मायबोलींचा, या भूमीला इतिहास आहे गडकोटांनी अनुभवलेल्या सुवर्णकाळाचा, या भूमीला इतिहास आहे त्या असंख्य अज्ञात मावळ्यांचा ज्यांच्या रक्तामुळे स्वराज्य अबाधित राहिले व हे वैभव जपण्याचा समाजासमोर आणण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेन.